४५. श्रद्धा कशी पक्क्ी हवी
नंदी नावाचा कोड उठलेला ब्राह्मण्ा श्रीगुरुंच्या दर्शनासाठी आला. आधी देवीमातेची आराधना केली होती. धरणे धरून बसल्यावर त्याला गाणगापुराला जाण्याचा दृष्टांत झाला. श्रीगुरुंनी विचारलेच - मनात संशय धरून का आलास? त्याने अज्ञानाची कबुली दिली. संगमावर स्नान करून आला. अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या. पोटरीवरचे कोडही गुरुंच्या स्तुतीपर कवितेमुळे नाहीसे झाले. अज्ञानी नंदीच्या जिभेवर भस्माची चिमूट ठेवून त्याला ज्ञान व काव्यशक्ती दिली.
श्रीगुरु म्हणती द्विजासी। मुख उघडी काढी जिव्हेसी।
विभूती शिंपिती तयासी । ज्ञान उपजले ब्राह्मणा।।६५ ।।अध्याय ४५ ।।
मी अज्ञानी, नामे नंदी, श्रीगुरुंनी केले आनंदी।।ध्रु।।।
सर्वांगावर कोड उमटले, आप्तांनी मज दूर लोटले,
चामडीच का, हे जग बघते, घरीच झालो बंदी ।।१।।
उपासना केली देवीची, परि नच करुणा आली माझी,
अंतरिची आर्तता वाढली, आवेगे आक्रंदी।।२।।
हवीच श्रद्धा अगदी पक्की, दिसे प्रयत्ने प्रगती नक्की,
धीराने सोसावे लागे, सुयश लाभते अंती ।।३।।
संगमात आचरिले स्नाना, गुरुस्तुतीपर केली रचना,
उरले सुरले कोड मावळे, आदरपूर्वक वंदी।।४।।
ज्ञान आपली चूक शोधते, सुधारले जग पुढती जाते,
अनुसंधाना राखायाचे, तरीच लाभे सिद्धी ।।५।।
Tuesday, April 27, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment