४० लाकडाला पालवी फुटली
श्रीगुरु गाणगापुरास असताना नरहरि नावाचा कुष्ठरोगी ब्राह्मण्ा त्यांना शरण आला. श्रीगुरुंनी म्हटले, तू गतजन्मी फार पाप केलेस म्हणून तुझी अशी अवस्था झाली. त्यांनी उंबराचे एक वाळके लाकूड देऊन त्याला संगमावर भीमातीरी रोपून रोज दोन कळशा पाणी घालायला सांगितले. पालवी फुटायला लागली की कोड बरे होऊ लागेल म्हणाले. ब्राह्मणाने सात दिवस उपास केले. जसा भाव तशी सिद्धी. सदगुरुंनी कंमंडलूतील पाणी शुष्क लाकडावर टाकताच औदुंबर झाला. नरहरीचा देह निरोगी झाला.
होता कमंडलू करकमळीं। भरले सदा गंगाजल।
उचलोनिया करकमळें। घालिती उदक काष्ठासी ।।६।। अध्याय ४० ।।
सद्गुरु, सद्गुरु, सद्गुरु, सद्गुरु
नसे विसावा रसनेला
संगमावरी लाकुड रोवून
घाली पाणी काष्ठाला ।।१।।
कुष्ठाने पीडिला नरहरी
दु:ख निवेदी दत्ताला
उपासना जर अविरत घडली
भाग्यतरु ये बहराला।।२।।
दोनच कळशा नियमित पाणी
औदुंबर खुलला फुलला
कुचेष्टेस ना जुमानले हो
भाव पोचता सिद्धीला।।३।।
कलंक सगळे धुतले जाती
कुमतीची बने सुमती
कुष्ठरोग चालला लयाला
सद्भक्ता येते प्रचिती।।४।।
अपुल्यापुरते क्षेत्र पहावे
सेवा चालू ठेवावी
दत्तात्रेयांसाठी खुपुनी
कुडी कारणी लावावी।।५।।
गुरुवाक्याला प्रमाण माना
संशय ना घेता कसला
नामसागरी जो जो बुडला
खरेच तो तरला तरला।।६।।
Tuesday, April 20, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment